उत्तर: डिजिटल साक्षर नसलेल्या व्यक्ती सेवा घेण्यासाठी, जवळच्या एमकेसीएल MS-CIT केंद्राला भेट देऊ शकतात. सोमवार ते शनिवार स.०९.३० – सायं.०५.३० (२ रा आणि ४ था शनिवार वगळता) आपल्या सेवेसाठी ते तत्पर असतील.
उत्तर: पोर्टलची सेवा घेण्यासाठी एका वर्षाकरीता आपल्याला ₹ १००/- इतके शुल्क द्यावे लागेल. आपण स्वत:च संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करू शकता. एमकेसीएल च्या इरा प्रणालीमध्ये मध्ये शिकणाऱ्या MS-CIT आणि सारथी DEEP-CSMS या कोर्सच्या विद्यार्थ्यांना मात्र जनलाभ पोर्टल एक वर्ष मोफत वापरता येईल.
उत्तर: आपण डिजिटल साक्षर व्यक्तींच्या / प्रेरकांच्या मदतीनेसुद्धा ही सेवा घेऊ शकता. संबंधित व्यक्ती / प्रेरक आपल्याला सेवा देण्यासाठी स्वत:चा बहुमूल्य वेळ देईल तसेच संगणक आणि इंटरनेट चा खर्च करेल. त्यासाठी आपण त्याला जास्तीत जास्त ₹ १००/- जादाचे शुल्क देवू शकता. यामध्ये त्या व्यक्तीने म्हणजेच प्रेरकाने नागरिकांची नोंदणी करणे, त्यांची संपूर्ण माहिती वेबपोर्टल वर भरणे, भरलेल्या माहितीवरून मिळणाऱ्या संक्षिप्त माहितीचे प्रिंट-आउट काढून देणे अपेक्षित आहे. ज्या ज्या वेळी आपण अशा व्यक्ती / प्रेरकांकडून ही सेवा घ्याल, त्या त्या वेळी आपण त्यांना हे जादाचे शुल्क देवू शकता. याव्यतिरिक्त जर आपणास इतर प्रिंट-आउटस हव्या असतील जसे की, शासकीय निर्णय, विहित नमुना अर्ज इत्यादी तर संबंधित व्यक्तीला आपण प्रती प्रिंट ₹ १/- ते ₹ ५/- देवू शकता.
उत्तर: 'जनलाभ' मध्ये पूर्ण तपशील भरण्यासाठी खालील नमूद विविध भागांमध्ये आपण माहिती भरू शकता:
१. वैयक्तिक माहिती
२. सामाजिक माहिती
३. संपर्क माहिती
४. कायमस्वरूपी निवासी पत्ता
५. सध्याचा निवासी पत्ता
६. शारीरिक आणि आरोग्यविषयक माहिती
७. इतर ओळखीची माहिती
८. कौटुंबिक माहिती
९. बँक खाते माहिती
१०. प्राप्त पुरस्कार माहिती
११. घरासंबंधी माहिती
१२. विमा माहिती
१३. रोजगार माहिती
१४. शेतीविषयक माहिती
१५. पशुधनविषयक माहिती
१६.बँक कर्जाबाबतची माहिती
वरील प्रकारे आपली संपूर्ण माहिती वेबपोर्टल मध्ये आल्यास आपली विविध योजनांसाठी ची संभाव्य पात्रता जलद गतीने पडताळून पाहता येईल. आपल्या भरलेल्या माहितीच्या आधारे, आपण संभाव्य पात्र ठरू शकणाऱ्या नवीन योजनांबाबत / विविध लाभांबाबत आपल्याला योग्य तो संदेश पाठवून कळविण्यास सोपे जाईल. आपल्याला वेळीच योजनांसाठीची पात्रता समजल्याने संबंधित योजनेचा लाभ तत्परतेने घेता येऊ शकेल.
उत्तर: नागरिक माहिती फॉर्मवर नमूद सगळी माहिती नागरिकांनी वेबपोर्टलवर भरलीच पाहिजे असा कुठेही आग्रह नाही. जनलाभ वेबपोर्टल नागरिकांना योजनांसाठी संभाव्य पात्रता पडताळून पाहण्यासाठी केवळ आवश्यक असलेलीच मोजकी योजनानिहाय माहिती विचारते. अशा वेळी प्रेरक म्हणून मदत करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांची माहिती वेबपोर्टलवर भरताना सोपे जावे, आणि कमीत कमी वेळात नागरिकांना सेवेचा लाभ मिळावा या उद्देशाने हा माहिती फॉर्म डिझाईन केलेला आहे. तो आपण जनलाभ पोर्टलवरून डाऊनलोड करून भरून ठेऊ शकता. नागरिकांनी आपले काम झाल्यास हा भरलेला फॉर्म जाताना आठवणीने बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे.
उत्तर: आपण स्वत: ज्या शासकीय योजनांना पात्र ठरू शकता त्याची व्यक्तिअनुरुप पद्धतीने प्रिंट स्वरूपात खालीलप्रमाणे माहिती मिळेल:
१. आपण पात्र होऊ शकणाऱ्या योजनांची यादी
२. संबंधित योजनांमध्ये मिळू शकणारे लाभ
३. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
४. अर्ज स्विकृती कार्यालय / अधिकारी संपर्क
५. योजनांसंबंधित उपलब्ध शासन निर्णय (जीआर) उपलब्ध असल्यास
६. विहित नमुना अर्ज उपलब्ध असल्यास
उत्तर: जनलाभ वेबपोर्टल हे शासकीय योजनांसाठी आपली केवळ संभाव्य पात्रता पडताळून पाहते. योजनांसाठी आपली अंतिम पात्रता ठरविण्याचे म्हणजेच आपल्याला अंतिम लाभ मिळवून देण्याचे काम हे संपूर्णपणे संबंधित शासकीय विभागाचे आहे. आपणास योजनेची योग्य ती माहिती मिळाल्यावर आपण संबंधित विभागांसोबत पाठपुरावा करू शकता.
उत्तर: अ) नागरिकांनी भरलेल्या माहितीवरून विविध शासकीय योजनासाठी त्यांची केवळ संभाव्य पात्रता पडताळून पाहिली जाते. नागरिकांची संबंधित योजनांसाठीची अंतिम पात्रता ठरविणे हा सर्वस्वी संबंधित शासकीय विभागांचा निर्णय आहे.
आ) कोणतीही पूर्वसूचना न देता योजना निधीअभावी किंवा इतर कारणास्तव बंद होऊ शकतात, त्यांचे पात्रता निकष, तपशील इत्यादी माहितीमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात या सर्व बदलांसाठी एमकेसीएल जबाबदार असणार नाही. परंतु हे सर्व बदल वेळोवेळी पोर्टलवर अद्ययावत कसे राहतील याविषयी एमकेसीएल सतत जागरूक आणि प्रयत्नशील असेल.
इ) सदर वेबपोर्टल वरील माहितीचे स्त्रोत हे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या विविध विभागांची संकेतस्थळे आणि वेळोवेळी घेतले गेलेले शासकीय निर्णय (जीआर) हे आहेत. या पोर्टलवर सध्या केवळ योजनांविषयीची माहिती उपलब्ध आहे. ज्याचा सेवा हमी कायद्याशी संबंध आहे अशा कुठल्याही प्रकारच्या सेवांविषयी हे पोर्टल संबंधित नाही अथवा त्या सेवा देत नाही. सेवा हमी कायद्या अंतर्गत येणाऱ्या विविध सेवांसाठी नागरिक महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेत स्थळाला भेट देऊ शकतात.
ई) कुठलाही नागरिक अंतिम प्रिंट-आउट वर नमूद योजना आपल्याला मिळाल्याच पाहिजे असा आग्रह करू शकत नाही अथवा तसे गृहीत धरू शकत नाही. पत्रावरून संबंधित विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला योजनेचा लाभ दिलाच पाहिजे असा आग्रह नागरिकांना धरता येणार नाही.
उ) डिजिटल साक्षर व्यक्ती अथवा प्रेरक यांच्या माध्यमातून सेवा घेत असल्यास, भरलेला माहिती फॉर्म नागरिकांनी परत जाताना आठवणीने सोबत घेवून जावा, कारण त्यावर नागरिकांची व्यक्तिगत माहिती लिहिलेली आहे. सदर फॉर्मवरील माहितीचा दुरुपयोग झाल्यास ही सुविधा देणाऱ्या कोणासही त्याकरिता जबाबदार धरता येणार नाही.
ऊ) आपण ज्यावेळी संभाव्य पात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधाल त्यावेळी सादर करीत असलेला विहित नमुना अर्ज हा संबंधित विभागाच्या नियमाप्रमाणे आहे याची खातरजमा करण्याची जबाबदारी नागरिकाची असेल.
उत्तर: बऱ्याच वेळेला असे आढळून येते की, नागरिकांना संगणकावर किंवा स्मार्टफोनवर वेबसाईट वापरता येत नाही. परंतु केवळ त्या कारणासाठी नागरीक जनलाभ सेवेपासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्या मदतीकरिता प्रेरक ही संकल्पना पुढे आली. थोडक्यात डिजिटली निरक्षर असलेल्या नागरिकांना जनलाभ सेवा देणारी डिजिटली साक्षर व्यक्ती म्हणजे प्रेरक होय. ज्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान आहे किंवा ज्यांना स्मार्टफोन उत्तमरीत्या वापरता येतो अशी कोणतीही व्यक्ती / युवा हे प्रेरक बनू शकतात.
उत्तर: 'प्रेरक' हा अगोदर स्वत: ची प्रेरक म्हणून नोंदणी करेल. वेबपोर्टलवर ‘प्रेरक लॉगीन’ अशी सुविधा देण्यात आलेली आहे. मग प्रेरक ‘प्रेरक लॉगीन’ मध्ये जाऊन नागरिकांची जनलाभ पोर्टलवर नोंदणी करेल. त्यानंतर प्रेरक नागरिकांची आवश्यक ती माहिती नागरिकांच्या संमतीने पोर्टलवर भरेल. नागरिकांना ते संभाव्य पात्र असलेल्या योजनांची माहिती देणारे पत्र मिळवून देईल. आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांना विहिती नमुना अर्ज आणि जीआर यांच्या प्रिंट काढून देईल.
उत्तर: प्रेरक हे नागरिकांची भेट घेतील आणि त्यांच्याकडून तो माहिती फॉर्म व्यवस्थित भरून घेतील. जनलाभ सेवा घेण्यासाठी जी माहिती भरावी लागते अशी सर्व माहिती त्या फॉर्मवर नागरीक भरतील तसेच त्यांना कशाची गरज आहे / काय हवे आहे हे सुद्धा नोंदवतील. नागरिकांकडून फॉर्म व्यवस्थित भरून घेतल्यावर प्रेरक हा ज्या ठिकाणी इंटरनेटची उत्तम सुविधा आहे अशा ठिकाणी येऊन संबंधित नागरिकाच्या माहितीची नोंद जनलाभ पोर्टलवर करेल. नागरीकाला ज्या लाभांची गरज आहे किंवा तो कोण आहे यानुसार जेवढ्या योजना दिसतील, तेवढ्याच योजनांची पात्रता पाहण्यासाठी, आवश्यक असणारी माहिती प्रेरक भरेल. म्हणजेच अर्जावरील उपलब्ध सगळ्याच माहितीची नोंद करण्याची प्रेरकाला गरज नाही. नागरिकांची नोंदणी करताना तो स्वत:च्या प्रेरक लॉगीनचा वापर करेल. जर प्रेरकाने स्वत:च्या लॉगीनमधून नागरिकांची नोंदणी केली तर त्यावेळी आवश्यक असलेला ओटीपी पहिल्या सेशनला विचारला जाणार नाही; यामुळे नागरिकांची नोंदणी आणि माहिती भरण्याचे प्रेरकाचे काम सोपे होईल. अर्थात प्रेरकाने पहिल्याच सेशन मध्ये संबंधित नागरिकाची पूर्ण महिती भरून त्याचे पत्र काढून देणे अपेक्षित आहे. काही कारणास्तव पहिल्या सेशनमध्ये संबंधित नागरिकाला जनलाभ सेवा देता आली नाही तर पुढच्या सेशनमध्ये नागरिकाची प्रोफाईल एडीट करताना मात्र ओटीपीची आवश्यकता भासेल. त्यामुळे शक्यतो पहिल्याच प्रयत्नात प्रेरक हा नागरिकांना जनलाभ सेवा देईल.
उत्तर: 'प्रेरक' हा जनलाभ मधील खूप महत्वाचा घटक आहे. प्रेरक बनून तुम्ही नागरिकांना ते संभाव्य पात्र असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती असलेल्या पत्राची प्रिंट-आउट मिळवून देणार आहात. साहजिकच डिजिटली निरक्षर अनेक नागरीक तुमच्याकडे मदतीसाठी येऊ शकतात. सामाजिक जाणीवेतून अशा सर्वांना मदत करताना तुम्हाला एक वेगळेच समाधान मिळणार आहे. केवळ तेवढेच नव्हे तर यातून आपणास व्यवसायाची एक उत्तम संधी सुद्धा मिळू शकते. कारण जनलाभ सेवा देताना तुम्ही संबंधित नागरिकांकडून प्रती नागरीक ₹ १००/- एवढे सेवाशुल्क घेऊ शकता. यामध्ये आपण त्या नागरिकाची जनलाभवर नोंदणी करणे, लॉगीन करून त्यांची आवश्यक ती माहिती पोर्टलवर भरणे आणि त्यांना माहिती पत्र काढून देणे अपेक्षित आहे. विहित नमुना अर्ज अथवा जीआर च्या प्रिंटची नागरिकांनी अतिरिक्त मागणी केली तर आपण किमान ₹ १/- ते जास्तीत जास्त ₹ ५/- पर्यंत प्रती प्रिंट प्रिंटींग शुल्क संबंधित नागरिकांकडून घेऊ शकता. जनलाभ पोर्टलवर योजनांची माहिती तसेच नागरिकांची पात्रता ही वेळोवेळी बदलत असते. त्यामुळे ठराविक काळानंतर नागरीक पुन्हा पुन्हा तुमच्याकडे सेवा घेण्यासाठी येऊ शकतात. अशा प्रत्येक सेवेसाठी आपण नागरिकांकडून जास्तीत जास्त ₹ १००/- पर्यंत सेवाशुल्क घेऊ शकता. त्यामुळे प्रेरक ही अनेक डिजिटल साक्षर अशा बेरोजगार युवांसाठी एक व्यावसायिक सुवर्णसंधी ठरणार आहे. प्रेरकाला आपल्या लॉगीन मध्ये त्याने आजवर किती नागरिकांची पोर्टलवर नोंदणी केली आणि त्यांपैकी किती जणांना प्रत्यक्ष सेवेचा लाभ म्हणजेच माहितीच्या पत्राची प्रिंट-आउट मिळवून दिली याचीही नोंद दिसणार आहे.